Pages

मी श्री.संतोष थोरात (प्राथ.शिक्षक) जि.प.प्रा. शाळा हिंगणी ता.कोपरगांव.जि.अ.नगर, ज्ञानसंजीवनी ब्लाॅगवर सर्वांचे स्वागत करतो

ज्ञानरचनावाद संकल्पना


@ ज्ञानरचनावाद @
ज्ञानरचनावाद

अलीकडे ज्ञानरचनावाद   हा शब्द  शिक्षणप्रक्रियेत अनेक वेळा वापरला जात आहे .हा ज्ञानरचनावाद एकदम आला कोठून ? इ . प्रश्न आपल्या  मनात येतात .राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF२००५) याचा तो पाया आहे ‘त्याच प्रमाणे बालकांचा मोफत व सक्तीचा  शिक्षणाचा हक्क अधीनियम  2009 (RTE ) मधील कलम  २९ मधेही ज्ञानरचना वादाची तत्त्वे आढळतात. त्यामुळे त्याची ओळख करून घेणे व वर्गाध्यापनामध्ये  त्याचा जास्तीत जास्त वापर  करणे  प्रत्येक शिक्षकाचे आद्य कर्त्यव्य आहे .
   
    आपण  नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे  अर्थ लावून  आपण जगत  असलेले  विश्व समजवून  घेणे , या भूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे .
   
   ज्ञानरचनावादी  शिक्षण  प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे ,जोहन ड्य़ूई,वायगोटस्की ,ब्रुनर आणि यांच्या विचारंशी  साम्य
असलेल्या  आणखी  काही शास्त्रज्ञानी आपले  विचार मांडलेले आहेत .
  
   ज्ञानरचनावादाची प्रस्तुती  वेगवेगळ्या शब्दात विविध तज्ञांनी केली असली तरी त्यात कोठेही  विरोधाभास  आढळत नाही .त्या  सर्व तज्ञ्यांच्या विचार नुसार  ज्ञानरचना वादाची  काही प्रमुख  तत्वे  आपणास सांगता येतील .
. ज्ञान हे स्थिती शील static नसून गतिशील DYANAMIC आहे .
. मनुष्य स्वतः शिकत असतो ,आपल्या ज्ञानाची रचना करत असतो .
. पूर्वानुभवाच्या  आधारे  मनुष्य  ज्ञान रचना करतो .
 . सामाजिक , भाषिक व सांस्कृतिक आंतरक्रीयेद्वारे ज्ञानाची निर्मिती होते .
. स्थानिक  परिस्थितीचा / परिसराचा  मोठा वाट ज्ञान रचनेत असतो.
     
     ज्ञानरचानावादी  अध्ययन –अध्यापनासाठी  या  तत्त्वांचा समावेश वर्गातील  अध्यन –अध्यापन प्रक्रीये मध्ये करावा लागेल . त्यासाठी प्रथम आपण वर्गातील ज्ञानरचनावादी  अध्ययन- अधायापन   प्रक्रिया समजून घेऊ .

        
           ज्ञानरचनावादी वर्गाध्यापन

 ज्ञानरचनावादी विचारसरणीनुसार नुसार शिकण्याची प्रक्रिया पुढील  तीन बाबीच्या  सम्यन्व्यातून घडून येते .

पूर्व ज्ञान
शिकवण्याची प्रक्रिया  हि सतत  चालणारी प्रक्रिया आहे. त्यानुसार  या संज्ञेचा  अर्थ  बालक  विशिष्ट नवीन  घटक शिकण्यापूर्वी  त्या घटका संदर्भातील त्याची  आधीची
समज  असा घेता येईल . वर्गातील प्रक्रियेत  शिक्षकाला  मुलाच्या पूर्वज्ञानाचा  विचार करून  अध्ययन – अनुभवाची  निवड व रचना करावी लागेल .

शिकण्याची तयारी
       शिकणाऱ्यांची  शिकण्याची  तयारी करण्यासाठी त्याची  शिकण्याची इच्छा  व त्याची पात्रता  या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे शिकतांना  त्याची भावनिक अवस्था  कशा प्रकारची आहे  हेही  महत्त्वाचे ठरते .भावनिक स्थिरतेतून  भावनिक प्रसन्नतेकडे जाणारी  बालकांची  मन: स्थिती  हि शिकण्यासाठी  योग्य  स्थिती असते .

अध्ययन  अनुभव
       बालकाला  ज्या अनुभावाद्वारे  नवीन ज्ञान प्राप्त  होणर असते तो अध्ययन-अनुभव ; म्हणजे  जो अनुभव  आजवर  त्याने घेतलेला नव्हता असा अनुभव, नवीनता हे त्यांचे वैशिष्ट आहे .या अनुभावाद्वारे नविन माहिती कशा स्वरुपात विद्यार्थ्यांसमोर येते यालाही महत्त्व आहे .अध्ययन –अनुभव  जितके संख्येने  जास्त , विषयाला / आशयाला सुसंगत  व समर्पक तेवढा  अध्ययनाच्या प्रक्रियेत नेमकेपणा येतो .असे अध्ययन – अनुभव विचारपूर्वक  विद्यार्थांना पुरवणे हि जबाबदारी  शिक्षकाची आहे .
    अश्या  प्रकारे  विद्यार्थ्यांचे  पूर्वज्ञान ,त्यांची शिकण्याची तयारी  आणि अध्ययन –अनुभव यांचा  योग्य समन्वय वर्गामधील अध्ययन –अध्यापन प्रक्रियेमध्ये घडवून आणावा लागेल. वर्गामध्ये शिक्षक  जे सांगतील  तसेच विध्यार्थी  करतात .शिक्षक  बोलतात तेच विध्यार्थी  ऐकतात .जोडवर्ग ,मोठे वर्ग , विषयांची  संख्या ,वेगवेगळया चाचण्या ,जोडीला एखादे  दुसरे अशैक्षणिक   काम या परिस्थितीमध्ये  वेळेत “पोर्शन “ संपवायची कसरत शिक्षक करत असतो . या प्रक्रियेत मुलांना  किती  समजले ,त्यांना काय वाटते , कोणती  गोष्ट त्यांना  कठीण जाते , त्यांना  काही अडले  आहे का,  यांसारख्या  गोष्टीना  वेळच मिळत नाही  किंवा दिला जात नाही . लहान मुले  उपजतच बहुविध  क्षमतेची  असतात . ती त्यांच्या  अंगभूत क्षमंतानुसार  व गतीनुसार शिकतात  आणि वेगवेगळ्या  पद्धतीने  ज्ञानाच उपयोजन करतात .बालमानसशास्र आणि शिक्षणशास्राने आपल्याला शिकवलेले हे  धडे  वर्गावर्गात  मात्र दूर्लक्षिले  जातात .शालामंध्ये  बहुतेक वेळा व्याख्यानपद्धती ,फलक लेखन , पाठांतर ,सराव .गृहपाठ  या चाकोरीतून जाणे शिक्षकांना  व त्याची सवय झालेल्या विद्यार्थी, पालक , यांना सोयीचे जाते .अशा पदधतीने  अनेक वर्ष  शिक्षणाची प्रकिया  पार पडत आहे .परंतु याचा अंतिम निष्कर्ष मुले खरेच काही शिकतात का? शिकत  नसतील ,तर तो विद्यार्थ्यांचा  क्षमतेचा ,बुद्धीचा  किवा शिक्षकांच्या  कौशल्याचा दोष मानला जातो , परंतु हे कितपत  खरे आहे ? दोष असेल  तर तो “शिकवणे “ या  पूर्वापार  चालत आलेल्या  संकल्पनेचा  दोष आहे ; हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच  आपण ‘शिकवणे  ‘ यावर  लक्ष  काढून घेऊन ते शिकणे  यावर केंद्रित  केले पाहिजे ,ज्ञानरचानावाद हि हेच सांगतो




 ज्ञानरचनावाद
                     लोकसत्ता


मुखपृष्ठ »संपादकीय »विशेष लेख »मुले कशी शिकतील?

मुले कशी शिकतील?

‘शिक्षण म्हणजे काय? त्याचे उद्दिष्ट काय? ज्ञानरचनावाद वापरावा की फक्त वर्तनवाद’ यावर जगभरात चर्चा

नंदकुमार | February 14, 2013 12:41 PM

  0  1 Google +0 WhatsApp0  92

‘शिक्षण म्हणजे काय? त्याचे उद्दिष्ट काय? ज्ञानरचनावाद वापरावा की फक्त वर्तनवाद’ यावर जगभरात चर्चा सुरू आहे. भारतात देशभरातील शासकीय व अशासकीय लोकांनी आणि लोकप्रतिनिधींनी चर्चा करून राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५ मध्ये ज्ञानरचनावाद स्वीकारला. त्यानंतर ‘मुलांना कसे शिकवायचे?’ याऐवजी ‘मुले कशी शिकतील?’ हा विचार करण्याची जबाबदारी सर्व संबंधितांवर  येते..
शिक्षणतज्ज्ञ नसलेल्या वाचकांसाठी एवढे समजून घेणे उपयोगाचे होईल की वर्तनवादी शिक्षणपद्धती ही जनावरांवर शिक्षणाबद्दल प्रयोग करून तयार झाली होती. माणसे कशी शिकतात याचा मेंदूविज्ञानाच्या आधारे अभ्यास झाल्यावर ज्ञानरचनावादाचा जन्म झाला. अर्थातच माणसाची मुले हुशार असतात, त्यामुळे वर्तनवादाने शिकविले तरी ती शिकून घेतात. मात्र नंतरच्या जीवनात बरीचशी मानवीय मूल्ये शिकण्यात त्यांना अडचण येते. शाळेत अक्षरओळख शिकले म्हणजे जीवनभर वाचन करतीलच असे नाही. गणित हा तर्काधारित विषय शिकला म्हणजे वागणुकीत तर्कशुद्धता येईलच असे नाही.
‘नेहमी खरे बोलावे’ हे सर्वानी शाळेच्या िभतीवर वाचले आहे. परंतु किती लोक खरे बोलतात? याबद्दल प्रत्येकाने ज्ञानरचनावाद लावून वैयक्तिकरीत्या विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. हाच विचार वर्गामध्ये सामूहिकरीत्या करून प्रत्येकाने स्वत:चा निर्णय घ्यायचा आहे. उदा. आजतागायत जमले नाही, परंतु यापुढे नेहमी खरे बोलेन, मारून टाकण्याची भीती असेल तेव्हाच फक्त खोटे बोलणार, मरेन पण खोटे बोलणार नाही, इ. ही शिक्षणाची ज्ञानरचनावादी पद्धत आहे. प्रत्येक माणूस नकळत एक प्रक्रिया करून स्वत:चा निर्णय घेतो. ही प्रक्रिया चिकित्सक पद्धतीने, निसर्ग आणि मानव समाज यांचा र्सवकष विचार करून व्हावी आणि प्रत्येक माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा हाच शिक्षणाचा उद्देश आहे. अशी प्रक्रिया हाच आत्मविश्वास आहे. हीच लोकशाही. हीच स्वतंत्रता. हीच समानता आहे. हाच ज्ञानरचनावाद आहे. अशा पद्धतीने जातिवाद, धर्मवाद, प्रांतवाद, भाषावाद, िलगवाद, भ्रष्टाचार, व्यसनमुक्ती इत्यादी सर्व विषयांवर एकाच वेळी मात करता येते. याला कोणाचा विरोध कसा असू शकतो?
शाळेत २०० वजा १८८ कसे शिकवले जाते आणि सद्यजीवनात आपण ते कसे करतो? १८८ मध्ये दोन मिळवल्यास १९० आणि मग १० मिळवल्यास २००, म्हणून २+१० म्हणजे १२ असा मनात विचार करून काही लोक उत्तरतात. शाळेतली पद्धत सहसा कोणी वापरत नाही. जे सोपे आणि सुखद वाटेल अशा पद्धतीने माणसे वागतात, अगदी गणितासारख्या तर्कशुद्ध विषयातसुद्धा. म्हणजे ज्ञानरचनावाद आणि शिकणाऱ्याची स्वायत्तता या गोष्टी शिक्षणात आपसूक आहेतच.
तेव्हाही लोक चूक होणार नाही याची काळजी घेतात, कारण चूक करणे कोणालाच आवडत नाही. चूक झालीच तर समजावून सांगण्यासाठी अधिक समजदार माणूस हवा असतो. तसेच कोणालाच शिक्षाही आवडत नाही. ज्ञानरचनावाद आणि स्वायत्तता या बाबी सर्व वयाच्या सर्व माणसांना, मुलांना, शिक्षकांना तसेच वरच्या पातळीवरच्या अधिकाऱ्यांनासुद्धा लागू आहेत. ज्याच्यात प्रत्येकाच्या स्वायत्ततेचा विचार असतोच. मुलांना शिकण्याची स्वायत्तता देताना शिक्षकांना शिकवण्याची स्वायत्तता द्यावीच लागते. हे समजून घेतल्यावर राज्याच्या स्वायत्ततेचा मुद्दाच उरत नाही.
वर्तनवादाचे मूळ पावलोव आणि स्कीनरसारख्या वैज्ञानिकांच्या प्रयोगावर आधारित आहे. या प्रयोगांमध्ये ‘काय केल्याने खायला मिळेल’ या विषयावर जनावरांचा अभ्यास आहे. जनावरांना जेवणापलीकडे काळजी नसते. परंतु माणसाला हे लागू केले तर तो ज्ञानरचनावाद वापरतो. ‘काही न करता खायला मिळत असेल तर काही करू नये’ असा अर्थ काढतो. याच पद्धतीने शिकलेले काही थोडे लोक ‘काम न करता पगार मिळतो तर काम का करावे’ असाही विचार करतात. असे विचार हीसुद्धा समाजासाठी दु:खाची बाब आहे.
वरिष्ठ पातळीवरील लोकांनी शिक्षणाचा प्रश्न समजून घेण्यासाठी खोलात जाण्याची गरज आहे. भय, लालूच आणि पसा यांचा वापर करून आम्ही जेवढे मिळवू शकत होतो ते मिळवले आहे. शाळा नाही, शिक्षक नाही, िभत नाही म्हणून शिक्षण नाही हे सांगण्याचे दिवस आता संपत आले. ‘सर्व भौतिक सुविधा असूनदेखील शिक्षण नाही; आता काय करावे’ या परिस्थितीत आपण आलो आहोत.
‘गुरुजी जे शिकवतात ते मला फार लवकर समजते, याचा मला आनंद मिळतो. शिकण्यात आनंद आहे म्हणून मी शिकतो. चांगले समजल्यावर चांगले गुण पडणारच. शिकण्याच्या आनंदानंतरच गुण मिळवण्याचा आनंद.’ हे झाले मुलांचे विचार. ‘मी शिकवतो तेव्हा मुले भराभर शिकतात याचा आनंद होतो म्हणून मी शिकवतो. परंतु मला जगण्यासाठी पगार हवाच असतो.’ हे झाले शिक्षकांचे विचार. मुले आणि शिक्षकांना वरील प्रकारे आम्ही आनंदी ठेवू शकलो तरच शिक्षण होणार आहे. तशी परिस्थिती निर्माण करण्याची आपली सर्वाची, विशेष करून वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची व संस्थांची जबाबदारी आहे.
प्रत्येकजण नेहमी आनंदी राहण्यासाठी झटतो हे समजून घेण्यासाठी शासनाच्या परवानगीने मी प्रेरणादायी शिबिरे देण्याचा प्रयत्न केला होता. यात मांडलेले विचार भारतीय राज्यघटनेशी १०० टक्के सुसंगत होते. माझी बदली होण्यापूर्वी साधारण ३५०० लोकांना याची तोंडओळख झाली. पूर्वी सांगितलेल्या, लिहिलेल्या, स्वत:च्या डोक्यात बसवलेल्या विचारांचे पुनíनरीक्षण करून, आज घडत असलेल्या बाबींची स्वत:च्या जीवनाशी सांगड घालून, स्वत:मधील अंतर्द्वद्व त्यांनी कमी केले. शिक्षक स्वत:ची उपयोगिता सिद्ध करण्यासाठी ‘मी शिकवल्याने मुले शिकतात’ हे पाहून घ्यायला लागले.
प्रत्येक व्यक्ती (अगदी मूलसुद्धा) नेहमी मूल्यांकन करत राहते. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना शिकताना त्रास होत असला तरी कौटुंबीय दबावांमुळे त्यांना शाळेत जावेच लागते आणि घरी अभ्यास करणे भाग पडते. बरेच लोक शाळेत त्रास घेऊनच शिकले आहेत, त्यामुळे शिकताना त्रास होणे त्यांना साहजिकसुद्धा वाटते. परंतु शिक्षणामध्ये मागे राहिलेल्या पालकांना प्रश्न पडतो की, त्रास घेऊन काही इयत्ता शिकले तरी शेवटी काय मिळणार आहे? शिक्षणाचा कायदा यशस्वी (१०० टक्के मुलांसाठी) करण्यासाठी अशा पालकांच्या मुलांना शाळेत टिकवण्यासाठी, शिकण्याचा आनंद दिल्याशिवाय पर्याय नाही.
शाळांमध्ये फक्त भौतिक सुविधा आणि शिक्षक पुरवून पुरेसे नाही. पशाने होणाऱ्या गोष्टी झाल्या. आता माणसांनी करायच्या गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत. ते म्हणजे अभ्यासक्रम, पाठय़क्रम, पाठय़साहित्य (पाठय़पुस्तकांसह), शिक्षक प्रशिक्षण (सेवापूर्व व सेवांतर्गत), मूल्यमापन (विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व विविध पातळ्यांवरील संस्थांचे) आणि लोकसहभाग या सर्वाचा एकसूत्रतेने विचार करून ते राबविणे. त्यासाठी एका संस्थेस (त्याची प्रमुख) जबाबदारी देण्याचा विचार देशपातळीवर मान्य झाला, शिक्षण हक्क कायद्याद्वारे बंधनकारक झाला व महाराष्ट्राच्या नियमावलीतही आला. काही राज्ये ही राबवण्यास पुढे गेली आहेत. बाकीच्यांनी झपाटय़ाने त्या दिशेने जाण्याची गरज आहे. राज्यस्तरीय संस्थांनी विश्वास कायम ठेवायचा आहे की, प्रत्येक मूल शिकू शकते आणि प्रत्येक शिक्षक शिकवू शकतात. शिस्तीने मुले आणि शिक्षक शाळेत हजर राहतील, पण शिक्षण होईलच याची खात्री नाही. वर्तनवादी भाषेत, घोडय़ाला पाण्यापर्यंत नेता येतं, पण पाणी पाजता येत नाही. आपण माणसांची चर्चा करत आहोत. तहान लागली की प्रत्येकजण पाणी पितोच. ज्ञानाची तहान मुलांना कशी लागेल? शिक्षकांमध्ये तरी आम्ही ज्ञानाची तहान निर्माण करू शकलो आहोत काय?
कायद्यानुसार १०० टक्के मुले शिकली पाहिजेत आणि त्यासाठी जगन्मान्य जास्त परिणामकारक पद्धत वापरली पाहिजे. हे ज्या राज्यांनी समजून घेतले त्यांचे शिक्षक कमी पडत नाहीत. ज्या राज्यांनी नवीन विचार लवकर आत्मसात केला नाही त्या राज्यांमध्ये जुन्या आणि नवीन पद्धतींच्या संभ्रमाच्या फटींमधून गुणवत्ता खाली घसरत आहे. २००५ पासूनच केरळसारख्या राज्यांनी तयारी केली. २०१० पासून जेव्हा सातत्यपूर्ण र्सवकष मूल्यमापन आणि नापास न करण्याचे धोरण राबवावे लागले तेव्हा त्यांना त्या तयारीचा फायदा झाला. याउलट, नॅशनल सँपल सव्‍‌र्हे ऑर्गनायझेशनच्या २००९-१० च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील आदिवासी जमातींच्या मुलांची कॉलेजमधील पटनोंदणी छत्तीसगढइतकीच कमी आहे. अडचणीत असलेल्या मुलांना शिकवणे आपल्याला अजूनही जमलेले नाही.
शिक्षण हक्क कायदा किंवा ज्ञानरचनावाद ही समस्या नसून बदलत्या काळात योग्य ते बदल (reform) न करू शकणे ही खरी समस्या आहे. शक्य तेवढय़ा लवकर समर्पक चर्चा घडवून झपाटय़ाने पुढे जाण्याची गरज आहे. महाराष्ट्रात खूप चांगले अधिकारी, शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, अर्थपूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा आणि स्वयंसेवी संस्था आहेत. ‘शिक्षण आमचा अधिकार’ असा विचार न करता ‘शिक्षण मुलांचा अधिकार’ यासाठी सर्वाना सोबत आणून काम करायची गरज आहे.
* लेखक भारतीय प्रशासन सेवेत कार्यरत अधिकारी व शिक्षणतज्ज्ञ आहेत.





ज्ञानरचनावाद काय आहे आणि काय नाही?

गेल्या काही वर्षांत शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेष करून प्राथमिक शिक्षणाच्या क्षेत्रात ज्ञानरचनावादाचा बराच बोलबाला आहे. रचनावाद, रचनावादी शिक्षणपद्धती असे शब्द वारंवार कानी पडतात. अनेकदा असे अनुभवास येते की या शब्दांचा अर्थ प्रत्येक जण आपल्याआपल्या सोयीने लावत असतो. शाळेत साधने वगैरे वापरून कृतियुक्त शिक्षण देणारे रचनावादाचे पुरस्कर्ते ‘आमच्या शाळेत आम्ही रचनावादी पद्धत वापरतो’ असे अभिमानाने म्हणताना दिसतात तर ‘रचनावाद येण्याआधी पासून आम्ही तुम्ही सांगता त्या गोष्टी करतच होतो, तुम्ही त्याला फक्त नाव दिलेत’ असे काहीजण म्हणताना दिसतात. काहीजण ‘वर्तनवाद’ विरुद्ध ‘रचनावाद’ अशी मांडणी करताना दिसतात. या मतमतांतरांमुळे बर्‍याच जणांचा गोंधळ होणे साहजिक आहे. त्यातून या विषयावर मराठीतून फारसे वाचायलाही मिळत नाही. म्हणून या लेखात रचनावादाची नेमकी संकल्पना काय आहे याची तोंडओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एक बाब लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे, ही केवळ तोंडओळख आहे. या विषयाची व्याप्ती बरीच मोठी असल्याने अधिकचे वाचन करून, सहकार्‍यांशी चर्चा करून रचनावादाची पुरेशी सखोल समज बनवणे शिक्षक़ांसाठी अत्यावश्यक आहे.

रचनावाद हा मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकणारा एक सिद्धांत आहे. माणसाचे मूल कसे शिकते, या जुन्याच प्रश्नाचे नवे, अधिक विस्तृत उत्तर देण्याचा प्रयत्न रचनावादाने केला आहे. मात्र अजूनही या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर आपल्या हाती आले आहे असे नाही. मात्र नवनव्या संशोधनांतून या विषयीच्या आपल्या ज्ञानात नित्यनेमाने भर पडत आहे हे नक्की. मुलांच्या शिकण्याबाबत रचनावादाचे काय म्हणणे आहे हे पाहण्याआधी, आपण शिकण्याबाबतचे रचनावादाच्या आधीचे सिद्धांत काय होते हे पाहणे गरजेचे आहे.

कोरी पाटी सिद्धांत

‘मुलाचे मन म्हणजे कोरी पाटी त्यावर आपण हवे ते लिहू शकू’ (याचेच दुसरे रूप म्हणजे ‘मूल म्हणजे मातीचा गोळा’) असा सिद्धांत अनेक वर्षे रूढ होता. अजूनही त्याचे पडसाद कुठे क़ुठे ऐकायला मिळतातच. बाहेरच्या जगाचे प्रतिबिंब किंवा छाप मुलाच्या ‘रिकाम्या’ मनावर उमटणे म्हणजे मूल शिकणे अशी कल्पना अनेक दिवस सर्वमान्य होती. पण हळूहळू लक्षात आले की प्रत्येक मुलाला ‘आपल्याला हवे ते, हवे तसे, हवे तेव्हा’ शिकवता येईलच असे नाही. एकाच वातावरणात वाढणारी किंवा एकाच शिक्षकाकडून शिकणारी सगळीच मुले सारखी शिकत नाहीत. जर मुलांची मने म्हणजे कोर्‍या पाट्या असत्या तर मुलांच्या शिकण्यात असा फरक पडायचे कारण नाही !

वर्तनवादाचा सिद्धांत - स्वरूप आणि मर्यादा
मुलांच्या शिकण्याबाबतच्या अजून एका सिद्धांताचे अधिराज्य शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक वर्षे राहिले. तो म्हणजे वर्तनवादाचा सिद्धांत. आजही शिक्षणशास्त्राच्या अभ्यासक्रमात हा सिद्धांत विस्ताराने अभ्यासला जातो. मानसशास्त्र म्हणजे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही व्याख्या लोकांना भोंगळ वाटायला लागली कारण मनाच्या अस्तित्वाचा व स्वरूपाचा पुरावा देणे शक्य नव्हते. बारकाईने बघितले तर आपण एखाद्याच्या मनाबाबत जे आडाखे बांधतो ते त्याच्या वर्तनाच्या आधारे बांधतो. (उदाहरणार्थ, नितीनचे मन उदास आहे याचा आडाखा आपण ‘तो तोंड पाडून बसलाय’ ‘बोलत नाहीये’ असे त्याचे वर्तन पाहून बांधतो! कारण वर्तनाचे त्रयस्थपणे निरीक्षण करता येते.) त्यामुळे मग ‘वर्तनाचा अभ्यास करणे म्हणजे मानसशास्त्र’ अशी व्याख्या केली जाऊ लागली. या व्याख्येच्या शास्त्रीय असण्याचा दबदबा इतका होता की मानसिक अवस्था वा प्रक्रियांबद्दल बोलणे अशास्त्रीय गणले जाऊ लागले. वर्तनाचा अभ्यास करण्याच्या काळात प्राण्यांचे वर्तन अभ्यासण्याचे अनेक प्रयोग मानसशास्त्रज्ञांनी केले आणि प्राण्यांचे वर्तन आपल्याला हवे तसे बदलता येते हे सिद्ध करून दाखवले. वर्तनात बदल घडवण्याचे त्यांचे साधन होते बक्षिसे आणि शिक्षा ! एखादे वर्तन केल्यावर बक्षीस मिळाले तर प्राणी ते वर्तन पुन्हा पुन्हा करतो आणि शिक्षा मिळाली तर ते वर्तन करत नाही अशी ही ढोबळ व सहज दिसणारी मांडणी होती आणि म्हणून मग ‘मुलाच्या वर्तनात शिक्षकाला अपेक्षित बदल घडणे म्हणजे शिकणे’ अशी आपल्याला सुपरिचित असलेली शिकण्याची व्याख्या अस्तित्वात आली. वर्तनातील हा बदल कायमस्वरूपी टिकावा यासाठी पुन्हा पुन्हा सराव करणे गरजेचे आहे हेही लक्षात आले. प्राणिल स्वरूपाच्या गोष्टी मूल कसे शिकते हे सांगण्यात वर्तनवाद कमालीचा यशस्वी झाला. मात्र माणसाच्या मुलाचे शिकणे प्राण्यांपेक्षा कमालीचे गुंतागुंतीचे असते. त्याचे समग्र स्पष्टीकरण वर्तनावादाच्या आधारे करणे कठीण होऊ लागले.

मूल मातृभाषा (खरे तर परिसर भाषा म्हणायला हवे !) कशी शिकते हे सांगताना वर्तनवादी सिद्धांत अगदीच तोकडा पडू लागला. माणसाची भाषा ही एक अत्यंत गुंतागुंतीची चिन्हप्रणाली आहे. जगातल्या खर्‍या वस्तू, क्रिया, भावना, वस्तूचे गुणधर्म असे बरेच काही शब्दांच्या चिन्हांनी आपण दाखवत असतो. भाषेतील शब्द आणि तिच्या व्याकरणाचे नियम वापरून आपण मनातल्या मनात विचार करू शकतो. मातृभाषेचे नियम, व्याकरण, जटिल वाक्य-रचना एखादे दोनतीन वर्षांचे मूल कसे शिकते, भाषा वापरून आपण विचार कसा करू शकतो, याचे उत्तर वर्तनवादी सिद्धांताला देता येईना.

आकलनवाद

वर्तनवादी शास्त्रज्ञ भाषेकडे आणि विचारप्रक्रियेकडे फक्त एक वर्तन म्हणून पाहत असत. कारण विचार-प्रक्रिया अभ्यासायची तर मनाचे आणि मानसिक प्रक्रियांचे अस्तित्व मान्य करायला लागणार आणि ते नाकारूनच तर वर्तनवादाची सुरुवात झाली होती! या प्रश्नावर तोडगा म्हणून आकलनवादी विचार मांडले गेले. ‘मूल भाषा कशी शिकते, हे केवळ अभिसंधान प्रक्रिया वापरून स्पष्ट करणे अशक्य आहे’ अशी मांडणी नोआम चॉम्स्कीसारख्या भाषातज्ज्ञाने केली. माणसाची विचारप्रक्रिया म्हणजे वर्तन नाही, तर विचारप्रक्रियेचा प्रभाव वर्तनावर पडतो. विचार- प्रक्रिया ही मानसिक पातळीवर चालणारी क्रिया असल्याने, आकलनवादासोबत मानसिक-अवस्था व मानसिक-प्रक्रिया यांना मानसशास्त्राच्या अभ्यासात परत स्थान मिळाले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे की आकलनवाद्यांनी वर्तनवाद पूर्णपणे नाकारलेला नाही, मात्र तो शिकण्याची समग्र प्रक्रिया उलगडण्यास तोकडा आहे, असे सप्रमाण दाखवून दिले आहे.

ज्ञानरचनावाद

मानसिक पातळीवरील कल्पना प्रक्रिया यांचा अभ्यास करणे मानसशास्त्रात पुन्हा एकदा दाखल झाल्यावर, शिकण्याची प्रक्रिया काय आहे हे उलगडून दाखवण्याला बराच वेग आला. त्यातूनच ज्ञानरचनावादाची कल्पना पुढे आली. मूल आपल्या मनातील जगाबाबतच्या धारणा आणि परिसरातून मिळणारा अनुभव यांच्यातील आंतरक्रियेतून स्वत:च्या ज्ञानाची रचना करत असते असा रचनावादाचा मध्यवर्ती विचार आहे. मूल आपल्या ज्ञानाची रचना कशी करते यावर ज्ञानरचनावाद बराच प्रकाश टाकतो. मूल अगदी जन्मापासून अवतीभोवतीचे जग समजून घेण्याचा प्रयत्न करते. वस्तू मुठीत पकडणे , तोंडात घालणे, वस्तू एकटक न्याहाळणे ही मुलाची जग समजून घेण्याची धडपड आहे असे ज्ञानरचनावादात मानले जाते. एकदा का मुलाला भाषा अवगत झाली की ज्ञानाची रचना करण्याला मोठीच गती मिळते. शब्दांच्या आधारे मूल नव्या नव्या धारणा बनवते आणि अनुभव वाढला की बनलेल्या धारणा मोडून पुन्हा नव्याने बनवते. ‘पुरुष’ या शब्दाची एका मुलाची धारणा वाढत्या अनुभवाबरोबर कशी बदलत जाऊ शकते, याचे पियाजेंनी दिलेले उदाहरण आपण पाहू या. अर्थातच एका अतिशय गुंतागुंतीच्या प्रक्रियेचे हे काहीसे ढोबळ वर्णन आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

१. सुरुवातीला ‘बाबा’ या शब्दाचा अर्थ पुरुष या शब्दासारखाच असतो. त्यामुळे सर्व पुरुषांसारख्या दिसणार्‍या व्यक्तींना मूल बाबा म्हणते.

२. हळू हळू त्यातून आजोबा, दादा असे वयानुसार पडणारे काही गट वेगळे होतात. मग त्या त्या वयोगटातील व्यक्तींना मूल दादा वा आजोबा म्हणू लागते. या टप्प्यावर पुरुष या धारणेत किमान आजोबा, बाबा व दादा असे तीन गट आहेत.

३. काका, मामा अशी नाती लक्षात येऊ लागली म्हणजे मुलाची पुरुष या गटाची धारणा अधिक विस्तारते.

४. हळू हळू वाढत्या अनुभवाबरोबर पुरुष या शब्दाची मोठ्या माणसांच्या धारणेसारखी धारणा मूल बनवते.

मुलाने संकल्पना बांधण्याची ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. आता वर्तनवादी दृष्टिकोनातून वरील घटना पाहायची झाली तर बाबा, दादा, आजोबा या शब्दांचे (खरे तर आवाजांचे) अभिसंधान वेगवेगळ्या वयाच्या व्यक्तींशी होते व त्यातून मूल हे वेगवेगळे शब्द उच्चारते असे म्हणावे लागेल. पण असे सुटे सुटे शब्द उच्चारणे हे काही मुलाची नात्यांबाबतची समग्र समज दाखवत नाही. मुलाच्या शिकण्याची प्रक्रिया उलगडण्यासाठी वर्तनवाद तोकडा पडतो म्हणजे काय याची या उदाहरणावरून कल्पना यावी.
महत्त्वाचा मुद्दा असा की ज्ञानरचनावादात मुलांच्या अनुभवाला शिकण्याच्या प्रक्रियेत मध्यवर्ती स्थान आहे. समृद्ध अनुभवांखेरीज मुले ज्ञानाची रचना करणार नाहीत असा ज्ञानरचनावादाचा विश्वास आहे. म्हणूनच अनेकदा हाताने करून शिकणे प्रभावी ठरते असा आपला अनुभव आहे. मात्र ज्ञानरचनावादी दृष्टीने शिकवण्यासाठी नेहमीच काही तरी हाताने करणे गरजेचे आहे हापण एक गैरसमज आहे. किंवा हाताने काहीतरी करायला दिले म्हणजे ज्ञानरचनावादी दृष्टीने शिकवले असे होत नाही. ज्ञानरचनावादी दृष्टिकोन विकसित झाला म्हणजे शिक्षकांच्या शिकवण्यात एक नेमकेपणा येतो, प्रत्येक मुलाची ज्ञानरचनेची प्रक्रिया वेगळी असल्याचे लक्षात आल्याने शिकवण्यात जी लवचीकता येते हे महत्त्वाचे आहे.

अजून एक महत्त्वाचा मुद्दा ज्ञानरचनावादातून पुढे येतो. तो म्हणजे मुलांच्या धारणा एकदम बनत नाहीत तर त्या बनतात, मोडतात आणि पुन्हा नव्याने बनतात. त्यामुळे आपण जसे सांगू तसेच्या तसे मूल ग्रहण करेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरते. इयत्ता आठवीत मुलाने तयार केलेली सूर्यमालेसारखी अणूची धारणा (म्हणजे मधे केंद्रक आणि भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन अशी) आणि प्रत्यक्ष अणूची रचना यात मोठेच अंतर आहे. पण म्हणून आपण आठवीच्या मुलाची धारणा चुकीची म्हणत नाही. तर अणूची संकल्पना समजून घेण्यातली ती एक अनिवार्य पायरी मानतो. म्हणजेच ज्ञानरचनावादात मुलांच्या तथाकथित चुकांकडे शिकण्यातली एक पायरी म्हणून बघितले जाते.

आत्तापर्यंत केलेल्या विवेचनावरून कुणी विचारेल, ‘जर मूल स्वत:च ज्ञानाची रचना करणार असेल तर शिकवणार्‍यांचे काय काम?’ मात्र हा ज्ञानरचनावादाचा विपर्यास होईल. ज्ञानरचनावादात मोठ्यांसोबतच्या आंतरक्रियेलाही महत्त्वाचे स्थान आहे. ज्ञानरचनावाद ही संकल्पना जशीजशी विकसित होत गेली तसेतसे मोठ्यांच्या सहभागाचे महत्त्व अधिकाधिक पुढे आले. भाषा हे महत्त्वाचे साधन बर्‍याच प्रमाणात मोठ्यांशी झालेल्या आंतरक्रियेतूनच मुलांना मिळते. मूल ज्या समाजात वाढते त्या समाजातून मिळालेली भाषा हा मुलांच्या ज्ञानरचनेतील महत्त्वाचा घटक आहे.

तसेच एखाद्या मुलाची ज्ञानाची सध्याची धारणा लक्षात घेऊन तिथून कोणत्या नव्या धारणेपर्यंत मूल मोठ्यांच्या मदतीने पोहचू शकेल याचा अंदाज शिकवणार्‍याला घ्यावा लागतो.

ज्ञानरचनावादाचे काही पैलू आपण पाहिले. ते एका दृष्टिक्षेपात पुढीलप्रमाणे मांडता येतील.

१. मुले आपल्या ज्ञानाची रचना स्वत: करतात. या रचनेसाठी त्यांना विविध समृद्ध अनुभव मिळणे गरजेचे आहे.

२. ‘हाताने करून शिकणे’ हा ज्ञानरचनावादातील महत्त्वाचा भाग आहे.

३. मुलांच्या चुकांकडे त्यांच्या शिकण्यातली महत्त्वाची पायरी म्हणून पाहायला हवे. ज्ञानरचनावादात मुलांच्या व्यक्तिगत विचाराला आदराचे स्थान आहे.

४. मुलांच्या ज्ञानरचनेत मोठ्यांच्या सहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलाला शिकण्याच्या विशिष्ट टप्प्यावर काय आणि कशी मदत करावी याचे भान शिकवणार्‍या माणसाला असावे लागते.

ज्ञानरचनावाद हा शिकण्याबाबतचा सिद्धांत बराच प्रगत असला तरी तो शिकण्याच्या प्रक्रियेचे समग्र वर्णन करत नाही. शिकण्याच्या इतर सिद्धांतांप्रमाणेच तोही एक आंशिक सिद्धांत आहे. पण मुलांच्या शिकण्याचे बरेच नवे आयाम या सिद्धांतामुळे आपल्यासमोर आले हे खरे. शिकवताना शिक्षकाला अनेक सिद्धांतांचा एकत्र आधार घेऊन शिकवावे लागते. हे वास्तव लक्षात घेता शिकण्याबाबतचे सर्वच सिद्धांत अभ्यासून, पचवून डोळसपणे शिकवता येणे हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे.

1. पिंजर्‍यात बंद असणार्‍या एखाद्या उंदराला ‘कळ दाबल्यावर अन्न मिळते’ हे अपघाताने समजले, तर तो हवे तेव्हा कळ दाबून अन्न मिळवायला शिकतो. कळ दाबणे हे वर्तन अन्नाच्या बक्षिसामुळे उंदीर पुन्हा पुन्हा करतो. काही काळाने जर वारंवार कळ दाबून अन्न मिळाले नाही तर तो कळ दाबणे बंद करतो. कळ दाबणे आणि अन्न मिळणे यात जो संबंध जोडला जातो त्याला अभिसंधान किंवा Conditioning असे म्हणतात.वर्तनवाद्यांच्या मते अभिसंधान ही शिकण्यातील प्रमुख प्रक्रिया आहे.

2. तीन वर्षांच्या आयुषचे हे वाक्य पाहा - ‘इथे झुरळ मरले आहे बघ.’ या क्रियापदाचे ‘मरले’ असे भूतकाळातील रूप केले आहे. अर्थातच त्याच्या आसपासचे कोणीच हे रूप वापरत नाही. सगळेजण ‘झुरळ मेले’ असे रूपच वापरतात. मात्र लहानग्या आयुषच्या मनात मराठीचे व्याकरण आकार घेते आहे, त्यामुळे त्याने बसले, उठले यासारखे मरले असे रूप बनवले आहे. कोणीही कधीही न वापरलेले हे क्रियापदाचे रूप आयुषला कसे सुचले याचे स्पष्टीकरण वर्तनवादी सिद्धांताच्या आधारे देता येत नाही.

3. सहावीच्या वर्गात गुरुजींनी ऋण संख्या शिकवल्या, पूर्णांक संख्यांची बेरीज-वजाबाकी शिकवली आणि मुलांना उदाहरणे सोडवायला दिली. त्यांना असे दिसले की बर्‍याच जणांचा ऋण संख्यांच्या बेरीज-वजाबाकीत तर गोंधळ उडालाच, पण गंमत म्हणजे ४-३ =? यासारख्या उदाहरणातही मुलांनी चुका केल्या होत्या. इयत्ता सहावीत येईपर्यंत सहजपणे येणार्‍या वजाबाकीत मुलांनी का चुका केल्या ? आतापर्यंत नैसर्गिक संख्याच्या आधारे वजाबाकीची जी धारणा मुलांनी बनवली होती ती पूर्णांक संख्यांच्या वजाबाकीच्या नियमांमुळे मोडून पडली आणि त्यामुळे आता वजाबाकीची नवीन धारणा बनेपर्यंत मुलांचा स्वाभाविकपणेच गोंधळ झाला. ही नवी धारणा बनेपर्यंत मुलांना वेळ द्यायला हवा असे ज्ञानरचनावादावर विश्वास असणारा शिक्षक़ म्हणेल.

4. उदाहरणार्थ एखादे मूल अपूर्णांक शिकते आहे. अपूर्णांकांची मूलभूत कल्पना (आकृती पाहून अपूर्णांक लिहिणे वगैरे), अपूर्णांकाचे वाचन, लेखन या बाबी त्याला स्वतंत्रपणे येत असल्या तरी दोन अपूर्णांकांमधला लहान मोठेपणा ठरवायला त्याला लगेच जमेल असे नाही. काही दिवस निरनिराळ्या अपूर्णांकांच्या जोड्यांवर शिक्षकांच्या मदतीने, शैक्षणिक साधने वापरून काम केले म्हणजे मग लहान-मोठेपणा ठरवणे मुलांना शक्य होऊ लागते.

1 comment: